मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग सोमवारी आणि मंगळवारी रात्री अंशतः बंद राहणार आहे. डांबरीकरणाच्या कामासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात येणार असून, या काळात वाहनचालकांनी शक्यतो या मार्गावरून प्रवास करण्याचे टाळावे, असे पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
सोमवारी, दोन मे रोजी रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत वांद्रे ते वरळी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर मंगळवारी, ३ मे रोजी वरळी ते वांद्रे या मार्गावरील वाहतूक रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात मुंबई एंट्री पॉईंट्स लिमिटेड या कंपनीकडून मार्गावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. २००९ मध्ये या सेतू मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच डागडुजीच्या कारणांसाठी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
या दोन्ही दिवशी रात्रीच्या वेळी वाहनचालकांनी माहीम कॉजवे, दादर, प्रभादेवी या मार्गाचा वापर करावा, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
ST buses
एसटीच्या मार्गात आचारसंहितेचा अडथळा
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास