नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विष्णुदास भावे नाटयगृहात मनसेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटबद्दल आपली भूमिका मांडली. सरकारचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संपूर्ण भाषण येथे पाहा. “दिल्लीत ७० पैकी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही. ६३ जागांवर डिपॉझिट जप्त झाले. देशावर राज्य करणाऱ्या पक्षाची आज अशी स्थिती आहे. लाटांमध्ये अनेक पक्षांना धक्के बसतात,” असे राज ठाकरे म्हणाले.