यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देणार. असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात मोर्चा काढणाऱ्यांना दिला आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने रविवारी पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढला. त्यानंतत आझाद मैदान येथे राज ठाकरे यांनी खणखणीत भाषण केले. या भाषणाचा संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. शिवाय घुसखोरांवर कारवाई करण्याची मागणीही केली.