करोना संकटामुळे गेल्या मार्च महिन्यांपासून बंद असणारी मुंबईकरांची जीवनवाहिनी ठरलेली उपनगरीय रेल्वे सेवा लवकरच सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. करोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता नेहमीप्रमाणे सरसकट सर्वांना एकाच वेळी रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी चर्चा यावेळी झाली.

यादरम्यान मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत २९ जानेवारीपासून अतिरिक्त २०४ लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सध्या सुरु असलेल्या लोकल फेऱ्यांची संख्या २७८१ वरुन २८९५ वर पोहोचणार आहे. मध्य रेल्वेने लोकल फेऱ्यांची संख्या १५८० वरुन १६८५ तर पश्चिम रेल्वेने १२०१ वरुन १३०० वर नेण्याचा निर्णय घेतला आहे.

megablock
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे – लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द, काही उशिराने धावणार
pune marathi news, pune daund local train marathi news
पुणे-दौंड रेल्वे प्रवाशांची अडथळ्यांची शर्यत! रेल्वे प्रशासनाकडून निर्णय होईना
Wardha Yavatmal Nanded first train service from Kalamba to Wardha started
१५ वर्षांची प्रतीक्षा संपली; कळंब– वर्धा मार्गावर धावली पहिली रेल्वे
Jamtara Train accident
झारखंडच्या जामतारा स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, रेल्वेची १२ प्रवाशांना धडक, दोन जणांचा मृत्यू

उपनगरीय रेल्वे सेवा लवकरच

दरम्यान रेल्वेतून सर्वसामान्यांना प्रवास करु देण्यासंबंधीचा निर्णय अद्याप झालेला नाही. यामुळे रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारने परवानगी दिलेल्यांनाच प्रवास करता येणार आहे. इतरांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच प्रवाशांना करोनासंबंधित नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे.

मुंबई लोकल खरंच सर्वांसाठी सुरु होणार?
सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये मुंबई विभागाने सर्व उपनगरीय सेवा सुरु करण्यासंबंधी विनंती मिळाल्याचा उल्लेख आहे. तसंच सर्व सेवा २९ जानेवारीपासून सुरु करण्यात येतील असंही सांगण्यात आलं आहे. यावरुन सोशल मीडियावर २९ जानेवारीपासून सर्वांना लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली.

मात्र सोशल मीडियावर या फोटोचा चुकीचा संदर्भ जोडल्याचं समोर आलं. लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा उल्लेख यामध्ये असून प्रवाशांचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे.